Ad will apear here
Next
कवितेच्या शोधात
कविता करणे हा अनेकांचा छंद असतो. कविता अनेक प्रकारच्या असतात. त्यातून प्रेम, माया, भक्ती, राग-लोभ, चीड, संताप अशा मनातील सर्व भावना व्यक्त होतात. संतांच्या रचना याही कवितेचाच एक भाग असतात. अशा अनेकविध काव्याचे व कवींचे रसग्रहण अरुणा ढेरे यांनी ‘कवितेच्या शोधात’ यातून केले आहे.

केशवसुतांच्या ‘झपूर्झा’ या लोकप्रिय कवितेत त्यांनी कशाचे वर्णन केले आहे, केशवसुत कशाबद्दल बोलत आहे, याविषयी व खानोलकर, गटे, शंकर रामाणी, बा. भ. बोरकर यांच्या कवितांमागे काय विचार असतील ते येथे व्यक्त केले आहेत. संत ज्ञानेश्वर यांची लहान बहिण मुक्ताबाई हिच्या अभंगाची वैशिष्टे उलगडताना तिच्या व्यक्तिमत्वाचे वेगळचे पैलू अरुणाताईंनी अत्यंत सुंदररीत्या दाखविले आहेत.

‘अरे विठ्या, विठ्या! मूळ मायेच्या कारटया’ असे वर्णन ज्या भावनेने विठ्ठलभक्त संत जनाबाईने केले ती यातून व्यक्त करताना तिचे चित्रणही केले आहे. संत तुकाराम, संत नामदेव, बहिणाबाई या संतांच्या रचनांबरोबरच रेणूकाची गीते, निळावंतीची लावणी, सोनू व गौरीचे गाणे यांचेही रसग्रहण यात आहे.

पुस्तक : कवितेच्या शोधात
लेखक : डॉ. अरुणा ढेरे
प्रकाशक : अभिजित प्रकाशन
पाने : १५१
किंमत : २०० रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/GZHMBW
Similar Posts
प्रेमातून प्रेमाकडे मैत्रीत वयाचे बंधन नसते; पण काहीवेळा समाजबंधन असते. विशेषतः मैत्री स्त्री-पुरुषामधील असेल, तर हे नाते नितळपणे सांभाळावे लागते. सार्वजनिक क्षेत्रातील थोरामोठ्यांचे अतिशय नाजूक संबंधातील मैत्र अरुण ढेरे यांनी ‘प्रेमातून प्रेमाकडे’मधून वाचकांपुढे उलगडले आहे.
स्त्रीसंवेद्य स्त्रीच्या मनाला विविध कंगोरे असतात. ते जाणून घेते. साहित्याच्या स्त्रीमनाचा शोध डॉ. नीलिमा गुंडी यांनी ‘स्त्रीसंवेद्य’मधून घेतला आहे. याचा प्रारंभ एकोणिसाव्या शतकातील महत्त्वाच्या लेखिका ताराबाई शिंदे यांच्यापासून केला आहे.
प्रेरणा आयुष्य सगळेच जण जगत असतात; पण ते रडत-कुढत जगायचे की हसत-खेळत हे प्रत्येकाच्या स्वभावावर व विचारांवर अवलंबून असते. म्हणूनच आनंददायी जीवनासाठी विनोद अ. बांदोडकर यांनी ‘प्रेरणा’ या पुस्तकातून केलेले लेखन मार्गदर्शक ठरते.
साहित्य संमेलनाची कार्यक्रमपत्रिका जाहीर यवतमाळ : ११ ते १३ जानेवारी २०१९ या कालावधीत यवतमाळ येथे होणाऱ्या ९२व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची कार्यक्रमपत्रिका नुकतीच जाहीर करण्यात आली असून, लेखिका नयनतारा सेहगल यांच्या हस्ते ११ जानेवारीला सायंकाळी चार वाजता संमेलनाचे उद्घाटन होणार असून, संमेलनात चर्चासत्र, परिसंवाद, कविकट्टा, कविसंमेलन, प्रकट

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language